farmer Loan Waiver Scheme: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याचे बोललं जात आहे.
3 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याबद्दल विचार
येथे पहा पूर्ण माहिती
जवळपास 938 आदिवासी सोसाट्यांमध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा
विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा होत आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री माझी ताडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेतंर्गत महिलांना १५०० दर महिना दिले जाणार आहे त्यासोबतच तरुणांसाठी लाडका भाऊ ही योजना सुरु केली आहे. त्याद्वारे बारावी पास तरुणांना दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना 10 हजार रुपये मिळणार आहे.
वित्त विभागाकडून हालचाली सुरु farmer Loan Waiver Scheme
त्यानंतर आता राज्य सरकार शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी एक मोठी घोषणा करणार आहे यानुसार लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
अधिकृत घोषणा नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 938 आदिवासी सोसाट्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीं त्यामुळे आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबद्दल कधी घोषणा करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.